Saturday, December 31, 2011

Biggest fear

strength comes with fear
In any persons life what will be biggest fear
Why it's said that you get angry only on people whom you love most
If there is so much love why anger then, isn't it


Everyone must have thought on this surely
Then we try to answer these questions based on our situations
but we never answer ourselves fully and just try to go away from these questions


Why


Answer is simple though we ask these questions when someone
else does it we know that even we do the same thing


But then why do we do it


Let's try to answer simple question  that why we get angry on people we love most
The person we love the most is the person we depend on completely
We get used to that person so much that we hardly know or care how much that person is important in our life
So we start to take the person for granted so much that we deny the existence of the person as separate
But this cannot happen forever and once that person denies to be taken for and then we get angry
Here still both are loving each other the same way


Why this anger then


Its sense of insecurity in our kind for the person that the person will be denied every time
This is the most basic reason for anger in almost all case


This anger most of the time is unnecessary but human emotion can't help it




But why are we talking about anger for so much time when blog says biggest fear


It's because sense of insecurity causes anger and it's next stage is fear
Actually fear is always there when anger is shown off but never acknowledged


The fear comes into picture when anger doesn't work and makes person lose control


So what is biggest fear for a person other than death


The answer is already there
It's the felling of being rejected from the most loved one


so be careful and think twice before choosing person and surrender emotionally


The biggest strength is biggest fear




Ashish Shevale

Saturday, November 26, 2011

अरे चूप बस ना जरा



डोक्याला आहे ताप
मांडून ठेवले आहेत व्याप
आता चूप बस ना जरा


घेतले traning of sap
सगळे गळून गेले from tap
अरे त्याला बंद कर ना जरा


दुध पिऊन झालाय बॉस साप
अरे कुठे  फेडणार हे पाप
आता बस कर ना जरा

कंटाळून केली कंपनी swap
पण इथे हि तेच crap
आता वाजतील म्हणजे बारा

घरी जाऊन राजरोस
ऐकून तिचे रोजचे डोस
अगं चूप बस ना जरा

गळ्याचा घेतलाय माप
आता अजून एक necklace चा व्याप
अगं बस कर ना जरा

घरात आणि ऑफिस मध्ये सांभाळून तोरा
आता झडू लागलाय माझा तुरा
अरे नाचून थकला का रे मोरा




ही कविता weekend ला सकाळी आठ ला उठून cell वर लिहिली आहे त्यामुळे समजून घ्यावे


आशिष शेवाळे

Sunday, November 13, 2011

Cloud

have you ever seen a sky completely clean blue without a single even white cloud
I dont think it ever happen
then why do we expect people to be that way

Today saw the sky full with white and grey clouds and even black cloud with silver lining (I might be too much optimistic) from My apartment

The sun rays were trying there best to pierce through them

But the best part is the sun rays, the source, beautifies the cloud which blocks clean sky

just believe in source

Friday, November 04, 2011

प्रेम असंही

प्रेमाच्या सागरात बुडाल्यावर समजतं
गटांगळ्या खाणं काय असतं
मग गवताच्या पात्याच्या आधाराची अपेक्षा करणं
म्हणजे स्वतःला फसवणं असतं

इथे तर सगळं सोडून स्वतःला झोकून दिलेलं असतं
स्वतःच मी पण एका बंद कोपर्यात बांधून ठेवलेलं असतं

अशावेळेस जेव्हा मनाला वेदना होतात
आपली माणसं जेव्हा दूर लोटतात

मनाचा मग तोल सुटतो 
प्रेमाचा अंकुर मुळापासून खुडतो

वार्याने पेटवलेला वणवा कोण थांबवू शकेल
प्रेमाला अजून एक वेडा प्रेमी फक्त मुकेल

Wednesday, October 26, 2011

कलोजस

स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्‍या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्‍वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.

घरातून बाहेर पडलो आणि हजारातला एक होऊन चाकरीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावरच्या एका डबक्‍यातून एक कार भरधाव वेगानं निघून गेली आणि माझ्या पॅंटवर त्या चिखलाच्या पाण्याचे काही शिंतोडे उडवून गेली! काही कळायच्या आत पुढच्या वळणावरून दिसेनाशीही झाली. ना दाद; ना फिर्याद! तसाच रेटून चालत राहिलो. संतापाच्या तंद्रीत कुठल्या तरी वाहनासमोर जरासा रेंगाळलो, तोच त्या कारनं कर्कश हॉर्नचा आवाज, अंगावर कुणी वसकन्‌ ओरडावं, तसा फेकून दिला. दचकून थोडा बाजूला झालो. कारमालकानं जाता जाता तुच्छतेनं माझ्याकडं पाहिलं. "कहॉं कहॉं से आ जाते है साले!' असा त्याचा शेरा कानावर आदळला. पायांना गती दिली आणि वर भरलेल्या आभाळाकडं पाहत, कुठल्याही क्षणी कोसळेल, अशा पावसाची प्रार्थना करत स्टेशनकडे निघालो.
स्टेशनवर नेहमीसारखीच हीऽऽ गर्दी! "डिस्कव्हरी'वर वाळवीची वारुळं दाखवली होती, ती आठवली. एकमेकांना खेटलेली, चिकटलेली, बुजबुजलेली ती वस्ती! आम्हीही तसलेच. स्वतःचंच आयुष्य कुरतडत बसलेल्या वाळव्या. ट्रेन लेट होती. ती तिची वेळ झाली, तेव्हा आली आणि मला पोटात भरून निघाली. आजूबाजूला माणसंच माणसं. छोटे, मोठे, कर्कश, किनरे, भसाडे आवाज. शिंका, उचक्‍या, खोकले, मानेवर आदळणारे श्‍वासोच्छ्वास. माझे हात-पाय, डोकं, शरीर त्या गर्दीच्या स्वाधीन. तशातच पाऊसमहाराजांचं आगमन झालं आणि दरवाजाजवळ उभे असलेले आम्ही त्या थेंबांनी भिजू लागलो. कपड्यांआत घामाचा ओलावा नि बाहेर पावसाचा.

ईप्सित-स्टेशनावर बाहेर फेकला गेलो आणि छत्री उघडून ऑटो शोधायला लागलो. माझ्या एरियात येण्याचा ऑटोवाल्याला "मूड' नव्हता. त्याच्या हाता-पाया पडून, जास्त पैशाची लालूच दाखवून एकदाच्या त्याच्या रिक्षेत बसलो आणि त्याच्या गुर्मीदार उपकाराचं ओझं पाठीवर घेऊन ऑफिसात पोचलो.
आल्यावर बॉसच्या केबिनमध्ये उशिरा येणे, कामातली इफिशिअन्सी, पेंडिंग जॉबविषयी खेटरे खाणे इत्यादी बौद्धिकं, परिसंवाद उरकून अनेक खुर्च्यांपैकी एका खुर्चीत बसून कामाला प्रारंभ केला. कॉम्प्युटर बडवला. फायली उरकल्या. भेटायला आलेल्या क्‍लाएंट्‌सचे प्रश्‍न, खोचक तिरकस शेरे, संताप, समजावणी हे सोपस्कार उरकले. मध्ये डब्यातली गार भाजी-पोळी संपवली. चहाचे कप रिचवले. ऑफिसमधल्या दिवसाचा रकाना भरला आणि पुन्हा एकदा अफाट गर्दीतला एक कण होऊन ट्रेनमधून घरी निघालो. स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्‍या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्‍वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.
एक बधीर अनोळखी शरीर, अस्तित्व घेऊन दाराची बेल वाजवली आणि दार उघडताक्षणी "बाबा, बाबा' करत चिमुकलीचे रेशमी हात गळ्यात पडले. आत काहीतरी थरारलं. काहीतरी सजीव झालं. "बाबा, आज की नाही शाळेत काय झालं..', "बाबा, मला खांद्यावर बसव', "आमच्या टीचरनी निबंध सांगितलाय, तो दे ना लिहून...', आणि हे सारं तृप्त कौतुकानं पाहणारे माझ्या बायकोचे डोळे!
"अगं थांब पिलू, बाबा आत्ताच आलाय ना ऑफिसमधून...दमलाय बघ किती...त्याला पाणी दे आधी!' अशी तिची लगबग. हातात अलगद आलेला गरमागरम चहाचा कप! क्षणांच्या मागे एकदम एक मंद, सुरेल पार्श्‍वसंगीत सुरू झालं. बायकोचं लडिवाळ आर्जव..."अहो, आ आठवड्यात वेळ काढा हं...आई-बाबा म्हणत होते बरेच दिवसांत जावईबापू आले नाहीत जेवायला!'
मुलीला निबंध लिहायला चार वाक्‍यं सांगितली तर "आई ।।, बाबा कसला ग्रेट आहे. दहा मिनिटांत निबंध दिला,' असं सर्टिफिकेट हातात आलं! ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ती चूल पेटली आणि अन्नब्रह्माची ती ऊब डोळ्यांवर छान पेंग आणू लागली! आणि रात्रीच्या अंधारात पाठीवर अलगद मायेचा हात फिरला, "किती धावपळ करतोस रे आमच्यासाठी...दमलं का माझं बछडं!!'
थकल्या शरीराला पुढल्या दिवसासाठी बळ आलं. माझी "गरज' असलेले हे जिवलग, माझे आप्त, माझे सुहृद! माझी "ओळख' असलेली ही माझी माणसं, माझं जग, माझी आकाशगंगा! अंतरात लीन-दीन, ओळखशून्य, मावळलेला सूर्य पुन्हा पूर्वेकडं झेपावला...एका नव्या दिवसाच्या प्रारंभासाठी!

कलोजस
तो टीव्हीवर असतो
तेव्हा कोणीच नसतो,
अस्तित्वाच्या फांदीला लोंबणारा
चुरगळलेला मांसाचा
कंटाळलेल्या अस्थीचा
एक सांगाडा घामेजलेला,
गर्दीची गती अंगावर घेऊन
वहात जातो निर्जीवपणाने
कुर्ल्याकडे,
सांडपाण्यातील किड्यासारखा,
व्यक्तित्वहीन.
पण कुर्ल्यातील सिंगल रूममध्ये येऊन
चटईवर, चौपाईवर मरून
तो जेव्हा पुन्हा उठून बसतो
दिवेलागणीच्या प्रकाशात,
तेव्हा तो झालेला असतो
एक प्रचंड कलोजस
बाप
भाऊ
नवरा...
पेटलेल्या चुलीचा स्वामी,
छताला टांगलेल्या दिव्याचा
रखवालदार,
अस्तित्वाचे अठरा लगाम
सांभाळणारा,
अठरा सोनेरी अश्‍वांच्या पाठीवर
आसूड ओढीत
आपल्या ग्रहमालेचा परिवार
जीवनाच्या अंतराळात
मिरवीत नेणारा एक
साक्षात्‌ सूर्यनारायण!

- कुसुमाग्रज
("प्रवासी पक्षी' या काव्यसंग्रहातून)


वाक्यरचना संदीप खरे


स्त्रोत http://www.marathiradio.com/node/46

Thursday, September 29, 2011

सरळ गोष्ट सरळच असुदे

आजचा ब्लॉग थोडा रुक्ष वाटेल

गणितावर आहे ना

पण कधी कधी गणित पण जगण्याची पद्धत किंवा एखाद्या गोष्टी कडे बघण्याची पद्धत शिकवून जातं

खालील गणिताच कोडं असच आहे बघा सुटत का





एकदा ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले

बिल आला ७५ रुपये

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटरला दिले
तू तू मी मी

मेनेजर ने ५ रुपये कन्सेशन दिला

वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन (आता का ते विचारू नका)

आणि तिघांना १, १, १ रुपया परत दिला

प्रत्येकाला २४ रुपये पडले

इथपर्यंत सगळं ठीक आहे




मग प्रत्येकाला २४ + २४ + २४ = ७२ रुपये पडले + वेटरचे २ रुपये = ७४
मग १ रुपया कुठे गेला???




आता लहानपणा पासून असं शिकवलं आहे की गणित कधी चुकत नाही मग हे काय झाल
असं मनात आलं ना की कुठे गेले ते गणिताचे मास्तर त्यांना घालतो हे कोडं आणि फिदीफिदी हसतो

पण असं झालाच कसं


मी सरळ उत्तर नाही देणार पण तुम्हा लोकांना भावार्थ समजेल









वेगळ्या प्रकारे ही गोष्ट मांडतो

त्या तिघांची नाव अ ब क
सगळं सारख फक्त ते पाच रुपये वेटर ने अ ला सगळे आणून दिले
आता
अ चा खर्च २० आणि ब आणि क चा २५ आहे
अ नी खुश होऊन वेटर ला २ रुपये टीप दिली

आता
अ चा खर्च २२ आणि ब आणि क चा २५ आहे

मग
अ नी ब ला १ आणि क ला १ रुपये दिले

आता
तिघांचा खर्च २४ रुपये सारखा झाला




अरे आता चुकलेलं गणित बरोबर कसं झाल
कारण एकच
गणित चुकत नही आपण चुकीच पाहत आहे
आता या ब्लॉग च शीर्षक पटल असेल








आशिष शेवाळे

Wednesday, July 06, 2011

व्यक्त

संध्याकाळ ...
दाटलेलं आभाळ
मोर पिसारा फुलवायला
मन भरून नाचायला
पावसात चिंब व्हायला पिसारा फुलवून तयार
तितक्यात तिच्यावर हलकेच सूर्यकिरण ढगांमधून वाट काढून पडतात
आधीच तिचे डोळे पावसासाठी अधीर आता आणखीनच चमकतात
ढगांकडे पावसाचा आनंद व्यक्त करायला विजा आहेत गडगडाट आहे
मोराकडे त्याचं पिसारा आहे
पण तिच्याकडे...
तिच्याकडे तिच सुंदर मोहक लाजणार हसू आहे
फरक फक्त व्यक्त करण्यामध्ये आहे





हे मी vegas मध्ये venetian होटेल मध्ये पाहिलेल्या enchantment चित्राचं वर्णन आहे

Sunday, January 23, 2011

विश्वास

आज सकाळी उठलो
पाण्याचा नळ चालू केला आणि नळातून पाणी आलं
विश्वास होता पाणी असणार नळाला

मग फ्रीज उघडला दुध बाहेर काढलं चहा बनवण्यासाठी
विश्वास होता फ्रीज/इलेक्ट्रिसिटी रात्र भर चालू राहील आणि दुधाला नासवून देणार नाही

मग स्टोव चालू केला
विश्वास होता तो गरम होईल आणि चहा बनवायला मदत करेल

किती सहज या गोष्टी आपण गृहीत धरतो नाही
रात्री झोपताना विश्वास असतो उद्या सकाळ होईल सूर्य उगवेल म्हणून शांत झोपू शकतो
कोणीही कितीही म्हणल कि जगबुडी होणार आहे २०१२ ला तरीही ३० वर्षांनंतर फायदा होईल असा पेन्शन 
प्लान आपण घेतो

पण आपण नक्की कोणावर विश्वास ठेवत असतो
कोणाच्या बोलण्यावर
स्वतःवर
का आपल्या विस्वास ठेवण्याचा ताकदीवर
आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती गृहीत धरतो कारण आपण त्या शिवाय जगू शकत नाही

आपण आपल्या मनाला समजावत असतो कि सगळं ठीक आहे काही काळजी करायची गरज नाही
पण खरच का आपण इतकं निश्चितपणे सांगू शकतो का
थोडक्यात आपणआपल्या मनाला फसवत असतो पण त्या फसवाण्यावर आपण विश्वास ठेवत असतो

एकूण सांगायचं तर
आपण आपल्या विश्वास ठेवण्यावर विश्वास ठेवतो
आपल्या फसवाण्यावर विश्वास ठेवतो
किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर
आपण विश्वासावर विश्वास ठेवतो


आशिष शेवाळे