Saturday, May 08, 2010

ajun kahi charolya

दूर गेल्या शिवाय
जवळ येता येत नाही
प्रेमात पडल्या शिवाय
वेडं होता येत नाही


वयात आल्यावर प्रेम कवितांशिवाय
दुसरा काही सुचत नाही
माणसात आल्यावर त्या कवितांवर
हसण्याशिवाय दुसरा काही उरत नाही


जग धावत असले तरी
मला धावण्यात रस नाही
चालत सुद्धा जिंकता येत असताना
धावण्याची मला हौस नाही

देवाची इच्छा असेल तर
माणूस उचलला जायला वेळ लागत नाही
पण यमाची इच्छा नसेल तर
साधं मरण सुद्धा गवसत नाही